वाचा-
>> टी-२० क्रिकेटमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत १२ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ८ लढती न्यूझीलंडने तर भारताने फक्त ३ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील एक मॅच रद्द झाली होती.
>> दोन्ही देशांच्या फलंदाजांचा विचार केल्यास ब्रॅन्डन मॅकलमने टी-२०मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहे. त्याने चार सामन्यात ३ अर्धशतकांसह १३०.५०च्या सरासरीने २६१ धावा केल्या आहेत.
वाचा-
>> भारताकडून टी-२०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सर्वाधिक २२१ धावा केल्या आहेत. धोनीने ११ सामन्यात २२१ धावा केल्या असून रोहितने ९ सामन्यात १९८ तर विराट कोहलीने ५ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत.
>> गोलंदाजांचा विचार केल्यास इरफान पठाण आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी ५ विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, खलील अहमद, हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या आणि हरभजन सिंह यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या आहेत.
>> दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत दोन द्विपक्षीय टी-२० मालिका झाल्या आहेत. या दोन्ही मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. २००८-०९ मध्ये झालेल्या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा २-०ने पराभव केला. तर २०१८-१९मध्ये झालेल्या मालिकेत पुन्हा न्यूझीलंडने २-१ने विजय मिळवला.
वाचा-
>> न्यूझीलंडच्या भूमीवर भारताने फक्त एका टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. तर अन्य चार लढती गमवल्या आहेत.
>> आतापर्यंत ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या विराटने न्यूझीलंडमध्ये एकही टी-२० सामना खेळलेला नाही.
>> भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा न्यूझीलंडमध्ये सर्व प्रकारच्या सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या ८७ इतकी आहे.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times