मुंबई: इंडियन प्रिमियर लीग अर्थात स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामासंदर्भात आज झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा आणि अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. २०२०मध्ये यावेळी फक्त ५ दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तसेच डे-नाईट सामना ८ वाजता सुरू होईल.

वाचा-

यंदा आयपीएलमध्ये डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव होता. पण बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तसेच आयपीएलमधील फायनल मॅच अहमदाबाद येथील मैदानात होणार अशीच चर्चा होती. पण अध्यक्ष सौरव गांगुलीने फायनल मॅच मुंबईत होणार अहमदाबाद येथे नसल्याचे स्पष्ट केले.

वाचा-

रात्री होणाऱ्या सामन्यांच्या वेळांमध्ये कोणताही बदल नाही. याआधी प्रमाणे सर्व सामने रात्री ८ वाजता सुरू होतील. साडेसात वाजता सामना सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. पण तो प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे गांगुलीने बैठकीनंतर सांगितले.

वाचा-

यावेळी स्पर्धेत दुपारी ४ ते ८ यावेळेत फक्त पाच दिवस सामने होतील, असेही गांगुलीने स्पष्ट केले.

दिवसभरातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here