नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात बीसीसीआयने एक मोठा बदल केला आहे. काल आयपीएलच्या गर्व्हनिंग काउसिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मध्ये यावेळी बीसीसीआयने एका नव्या नियमाचा समावेश केला आहे. या नियमामुळे सामन्याचा निकाल देखील बदलण्याची शक्यता आहे. सामन्यात एखादा फलंदाज अथवा गोलंदाज जखमी झाला आणि तो सामना खेळू शकणार नसेल तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू सामना खेळू शकेल.

वाचा-

बदली खेळाडूच्या या नियमामुळे सामन्याच्या निकालावर देखील परिणाम होऊ शकतो. एखादा फलंदाज जखमी झाला तर त्याच्या जागी नव्या दमाचा खेळाडू सामन्याचा निकाल बदलू शकतो. तसेच गोलंदाज देखील अशाच प्रकारे सामना फिरवू शकतो. या नियमामुळे यंदा सामने अधिक चुरशीचे आणि रंजक होण्याची शक्यता आहे.

वाचा-

मुंबईत होणार फायनल

इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव होता. पण बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तसेच आयपीएलमधील फायनल मॅच अहमदाबाद येथील मैदानात होणार अशीच चर्चा होती. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने फायनल मॅच मुंबईत होणार अहमदाबाद येथे नसल्याचे स्पष्ट केले. अहमदाबाद येथील मैदान अद्याप तयार नसल्याचे गांगुलीने सांगितले.

वाचा-

रात्री होणाऱ्या सामन्यांच्या वेळांमध्ये कोणताही बदल नाही. याआधी प्रमाणे सर्व सामने रात्री ८ वाजता सुरू होतील. साडेसात वाजता सामना सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. पण तो प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे गांगुलीने बैठकीनंतर सांगितले.

IPLमध्ये ५ डबल हेडर

यावेळी आयपीएलमध्ये पाच डबल हेडर म्हणजेच एका दिवशी दोन सामने होतील. यापैकी पहिला सामना ४ वाजता तर दुसरा सामना ८ वाजता सुरू होईल.

IPLच्या आधी होणार ऑल स्टार मॅच

आयपीएलच्या आधी जगातील टॉपच्या खेळाडूंसह एका ऑल स्टार सामन्याचे आयोजन बीसीसीआय करणार आहे. हा एक मदत निधी सामना असेल असे, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here