भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मालिकेतील दोन सामने तर सुपर ओव्हरमध्ये गेले. पण तरीही न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही. दोन्ही वेळा भारताने बाजी मारली. भारतीय संघाने दोनपेक्षा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत व्हाइट वॉश देण्याची ही तिसरी वेळ आहे.
वाचा-
भारतीय संघाने याआधी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिला होता. ऑस्ट्रेलिविरुद्धच्या मालिकेत भारताने पहिला सामना ३७ धावांनी, दुसरा सामना २७ धावांनी तर तिसरा सामना ७ विकेटनी जिंकला होता.
वाचा-
त्यानंतर २०१९मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-०ने जिंकली होती. ही मालिका अमेरिका आणि वेस्ट इंडिज अशा दोन देशांमध्ये खेळवण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्यांदा एखाद्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवला. या मालिकेआधी दोन्ही संघांमध्ये ११ सामने झाले होते. त्यापैकी ८ न्यूझीलंडने जिंकले होते. आता या मालिकेनंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी ८ विजय झाले आहेत.
वाचा-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता ५ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेतील शानदार कामगिरी पुन्हा वनडेत देखील करण्यास विराट आणि कंपनी उत्सुक असेल.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times