ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चूका समोर आल्या. आता दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने धावांचा डोंगर उभा केल्यानंतर देखील पराभव स्विकारला होता. आता दुसऱ्या वनडे ईडन पार्कसारख्या छोट्या मैदानात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो.

वाचा-

याआधी टी-२० मालिकेत झालेल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताने दोन्ही डावात लक्ष्यचा यशस्वी पाठलाग केला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला सामना हरल्यानंतर कमबॅक केले होते आणि मालिका देखील जिंकली होती. आता न्यूझीलंडविरुद्ध देखील तशीच कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने चेन्नईत तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत भारताचा पराभव झाला होता.

वाचा-

आयसीसी वनडे क्रमवारीभारत- २
न्यूझीलंड-३

एकूण सामने- १०८
भारत-५५
न्यूझीलंड-४७
टाय-१
निकाल लागला नाही- ५

वाचा-

भारतीय संघाला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांना अपयश आले. त्याच बरोबर विकेट मिळवण्यासाठी फक्त जसप्रीत बुमराहवर अवलंबून चालणार नाही. पहिल्या वनडेतील पराभवाच्या अनेक कारणांमध्ये फिल्डिंग हे एक महत्त्वाचे कारण ठरले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय फिल्डिंगचा स्तर घसरल्याची चर्चा आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here