पॉटशेफस्ट्रूम: बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने १७७ धावा केल्या. भारतीय डावात ध्रुव जुरेल अजब पद्धतीने धावबाद झाला. या धावबादची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

भारतीय डावात ४३व्या षटकात रकीब उल-हसनच्या चेंडूवर ध्रुव जुरेल फलंदाजी करत होता. ध्रुवने रकीबचा चेंडू ऑफ साइडला मारला आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या अथर्व अंकोलेकर धाव घेण्यासाठी पुढे आला पण तो मधूनच मागे फिरला. तेव्हा ध्रुव देखील धावत पुढे आला. ध्रुव आणि अथर्व एकाच क्रीजवर आले. बांगालदेशच्या कर्णधार अलीने सहजपणे धावबाद केले.

वाचा-

पण नेमके कोण बाद झाले याचा निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या अंपायरची मदत घेण्यात आली. रिप्लेमध्ये ध्रुव आणि अथर्व दोघांनी एकाच वेळी बॅट क्रीजमध्ये ठेवल्याचे आढळले. तिसऱ्या अंपायरने जवळ जवळ ५ मिनिटाचा वेळ घेतला आणि ध्रुवला बाद ठरवले. तो २२ धावांवर माघारी परतला.

याआधी भारताविरुद्धच्या सेमीफायनल लढतीत पाकिस्तानचे फलंदाज अशाच पद्धतीने बाद झाले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here