बेंगळुरू: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या एका निर्णयाने सर्व क्रिकेट चाहत्यांना आणि खुद्द संघाचा कर्णधार याला हैराण केले आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त स्टार असेलल्या या संघाने एकही विजेतेपद मिळवले नाही. आता बेंगळुरू संघ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

RCB संघाने बुधवारी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले. आरसीबीने अचानक फोटो काढून घेतल्यामुळे संघाच्या चाहत्यांसह क्रिकेटपटूंना देखील आश्चर्य वाटले.

वाचा-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूच्या संघाने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलचे नाव बदलले आहे. तसेच डिसप्ले आणि कव्हर फोटो देखील हटवण्यात आला आहे. तर नावात बदल करत रॉयल चॅलेंजर्स असे ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा बदल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील करण्यात आला आहे.

वाचा-
अचानक सोशल मीडियावरील या बदलावर कर्णधार विराट कोहलीला देखील धक्का बसला आहे. त्याने ट्विटवरून जाब विचारला. RCBच्या पोस्ट दिसत नाहीत. किमान कर्णधाराला तरी कळवायचे. तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला सांगायचे तरी, अशा शब्दात विराटने जाब विचारला.

विराटच्या संघाने २००८ पासून सुरू झालेल्या एकाही स्पर्धेत विजय मिळवला नाही. संघाने अचानक सोशल मीडियावरील नावात बदल केला असून ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’वरून आता फक्त ‘रॉयल चॅलेंजर्स’ असे नाव करण्यात आले आहे.

वाचा-

आरसीबीने केलेल्या या बदलावर विराटच्या आधी भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अरे आरसीबी ही काय गुगली आहे. तुमचा प्रोफाईल फोटो आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेली?’, असा प्रश्न चहलने विचारला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here