बेंगळुरू: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ कालपासून चर्चेत आला आहे. RCB संघाने बुधवारी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले होते. आरसीबीच्या या निर्णयामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांना आणि खुद्द संघाचा कर्णधार याला हैराण केले होते.

RCBच्या या निर्णयावर विराटने सोशल मीडियावरून जाब विचारला होता. RCBच्या पोस्ट दिसत नाहीत. किमान कर्णधाराला तरी कळवायचे. तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला सांगायचे तरी, अशा शब्दात विराटने जाब विचारला.

वाचा-
विराटचे हे ट्विट काल सोशल मीडियावर चर्चेत होते. आता त्यावर RCBने उत्तर दिले आहे. ‘सर्व काही ठीक कॅप्टन! प्रत्येक गोष्टीची सुरूवात शून्यापासून होते आणि आपण देखील शून्यापासूनच सुरूवात करत आहोत’, असे उत्तर RCB ने विराटला दिले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूच्या संघाने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलचे नाव बदलले होते. तसेच डिसप्ले आणि कव्हर फोटो देखील हटवण्यात आला होता. तर नावात बदल करत रॉयल चॅलेंजर्स असे ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा बदल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील करण्यात आला होता.

वाचा-
विराटच्या संघाने २००८ पासून सुरू झालेल्या एकाही स्पर्धेत विजय मिळवला नाही. २००९ च्या स्पर्धेत बेंगळुरू फायनलमध्ये पोहोचला होता. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. संघाने अचानक सोशल मीडियावरील नावात बदल केला असून ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू’वरून आता फक्त ‘रॉयल चॅलेंजर्स’ असे नाव करण्यात आले होते.

नवा लोगो प्रसिद्ध
RCBने सोशल मीडियावर नवा लोगो प्रसिद्ध केला आहे. या लोगोत वाघाचा प्रतिकात्मक वापर करण्यात आला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here