ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकला होता तर एक गमवला होता. फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता.
वाचा-
आतापर्यंत झालेल्या सहा पैकी ४ वर्ल्ड कपचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवले आहे. भारतीय संघातील मधल्या आणि खालच्या स्तरातील खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारतीय संघ ग्रुप ए मध्ये असून यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.
वाचा-
मधल्या फळीतील शेफाली वर्माकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तिरंगी मालिकेत कर्णधार हरमनप्रीत कौरची कामगिरी खराब झाली होती. भारतीय संघातील फिरकीपटू शिखा पांडेकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
वाचा-
गेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. यावेळी भारतीय संघाला त्याच्या पुढे जावे लागले. २०१८च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात बरेच बदल झाल्याचे प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमन यांनी सांगितले.
स्पर्धेतील भारताच्या लढती
२१ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२४ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२७ फेब्रुवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड
२९ फेब्रुवारी- भारत विरुद्ध श्रीलंका
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times