वाचा-
जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत. तोपर्यंत मला वाटत नाही की भारताकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. सर्व भारतीय मोदींप्रमाणेच विचार करतात आणि मोदींचा कल नकारत्मकतेकडे झुकलेला आहे. भारत-पाकिस्तान पुन्हा सुरू होणार का प्रश्नावर पाकच्या माजी क्रिकेटपटूने हे मत एका मुलाखतीत व्यक्त केले.
वाचा-
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संबंध खराब झाले आहेत ते फक्त एका व्यक्तीमुळे आणि आम्हाला तसे नको आहेत, असे आफ्रिदी म्हणाला.
वाचा-
दोन्ही देशातील नागरिकांना एकमेकांच्या देशात प्रवास करायचा आहे. मला समजत नाही की मोदींना नेमक हवं तरी काय? त्यांचे धोरण आहे तरी काय, असा सवाल आफ्रिदीने विचारला. भारत-पाकिस्तान यांच्यात २०१३ पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. २०१३ मध्ये पाकिस्तान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
वाचा-
काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने त्याला पाचवी मुलगी झाल्याचे सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा पाकिस्तानच्या युझर्सनी त्याला प्रचंड ट्रोल केले होते. (वाचा संबंधित बातमी-
) आता मोदींसंदर्भात वक्तव्य करून तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times