नवी दिल्ली: बांगलादेश बोर्डाने देशाचे संस्थापक शेख मुजबीर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त दोन टी-२० सामन्यांचे आयोजन केले आहे. हे सामने आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन या संघात होणार आहेत. बीसीबीच्या या आशियाई संघात सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

वाचा-
आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन यांच्यातील सामने १८ आणि २१ मार्च रोजी होणार आहेत. आशियाई संघात भारताचा कर्णधार विराट कोहलीसह ६ जणांचा समावेश आहे. याशिवाय बांगलादेशचे ४, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन तर नेपाळचा एक खेळाडू आहे. या संघाचा कर्णधार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आशियाई संघात १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. दोन सामन्यातील एका सामन्यासाठी भारताचा केएल राहुल उपलब्ध असेल. कारण १८ तारखेला त्याला आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळायचे आहे. विराट कोहील दोन सामन्यात खेळेल का याबद्दल अद्याप बीसीसीआयने स्पष्ट केले नाही. कारण याच काळात भारत-आफ्रिका यांच्यात वनडे मालिका होणार आहे. जर रोहित शर्मा फिट झाला तर विराट दोन्ही सामने खेळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा-
आशियाई संघात , केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

वर्ल्ड इलेव्हन संघाचे नेतृत्व फाफ डु प्लेसिस करणार आहे. या संघात १२ खेळाडू असून त्यात ख्रिस गेलचा देखील समावेश आहे.

वाचा-

आशियाई संघ- विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिटन दास, तमीम इकबाल, मुशफिकुर रहीम, थिसारा परेरा, राशिद खान, मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा आणि मुजीब उर रहमान

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here