वाचा-
दुसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्माला एक मैलाचा टप्पा गाठण्याची संधी आहे. दुखापतीनंतर संघात परतलेल्या इशांतने पहिल्या सामन्यात शानदार कमबॅक करत ५ विकेट घेतल्या होत्या. ख्राइस्टचर्च कसोटीत इशांतने ३ विकेट घेतल्या तर त्याचा एलीट क्लबमध्ये समावेश होईल.
वाचा-
३१ वर्षीय इशांतने आतापर्यंत ९७ कसोटी सामन्यात २९७ विकेट घेतल्या आहेत. आणखी ३ विकेट घेतल्यास त्याच्या ३०० विकेट पूर्ण होतील आणि अशी कामगिरी करणारा तो सहावा गोलंदाज ठरले. याआधी कपील देव, जहीर खान या जलद गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.
वाचा-
भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कपील देव (४३४), जहीर खान (३११) यांच्याशिवाय फिरकीपटू अनिल कुंबळे (६१९), हरभजन सिंह (४१७) आणि आर.अश्विन (३६५) यांचा समावेश आहे.
वाचा-
वनडे आणि टी-२० संघातून बराच काळ बाहेर राहिलेल्या इशांतच्या नावावर कसोटीत एका अर्धशतकाचा समावेश आहे. २००७ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. तर जानेवारी २०१६ मध्ये अखेरची वनडे खेळली होती. इशांतने ऑक्टोबर २०१३ मध्ये राजकोटमध्ये अखेरची टी-२० खेळली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times