सिडनी: भारत आणि इंग्लंड यांच्यात आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील लढत गुरूवारी होत आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने गट फेरीत सर्व सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ग्रुप बी मध्ये एका पराभवासह दुसरे स्थान मिळवले आहे. या सामन्यावर पावसाचे संकट आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल…

वाचा-
सिडनी क्रिकेट मैदानावर ग्रुप फेरीतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सामना (३ मार्च) पावसामुळे रद्द करावा लागला होता. सिडनी परिसरात उद्या देखील ढगाळ वातावण आणि पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्सने आयसीसीकडे उपांत्य फेरीतील लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्याची विनंती केली. पण आयसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल करण्यास नकार दिला.

वाचा-
भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजता उपांत्य फेरीतील पहिली लढत होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे संकट आहे. नियमानुसार जर सामना रद्द झाला किंवा कमीत कमी प्रत्येकी १० षटकांचा सामना झाला नाही तर ग्रुप फेरीत जे संघ अव्वल होते त्यांना फायनल मध्ये प्रवेश मिळेल.

वाचा-
पावसामुळे दोन्ही सामने रद्द झाले तर चार वेळा विश्वविजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रेलिया संघ आणि एक वेळा विजेतेपद मिळवणारा इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर होईल. अशा परिस्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत होईल. भारताने ग्रुप ए मध्ये ८ गुणांसह तर आफ्रिकेने ग्रुप बी मध्ये ७ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. दोन्ही सामने रद्द झाले तर भारत-आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचतील.

वाचा-
पावसामुळे किंवा विजायमुळे भारत आणि आफ्रिका संघ अंतिम फेरीत पोहोचले तर ती देखील ऐतिहासिक घटना ठरले. कारण दोन्ही संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचतील आणि महिला टी-२० विश्वाला नवा विजेता मिळेल. स्पर्धेत भारत असा एकमेव संघ आहे ज्याने एकही सामना गमावलेला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here