मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताला अधिक गुणांच्या आधारावर अंतिम फेरीचे तिकिट मिळाले. येत्या ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. अंतिम सामन्यासाठी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास संदेश दिला आहे.

वाचा-
‘तुम्हाला फक्त तो क्षण जगायचा आहे आणि फायनलवर लक्ष्य केंद्रीत करायचे आहे. मी ऑस्ट्रेलियात असताना टी-२० चषकाच्या शेजारी उभा होतो आणि भारतीय महिला संघातील काही खेळाडू माझ्यासोबत होत्या. तुम्ही या चषकासोबत भारतात आल्यास छान वाटेल’, असे म्हटल्याचे सचिनने सांगितले.

वाचा-
‘तुम्ही मैदानात जा आणि सर्वोत्तम कामगिरी करा. कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नका. सध्या बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याची गरज नाही’, असे सचिनने म्हटले.

भारतीय महिला संघाची कामगिरी मी पाहिली आहे. त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे सचिनने सांगितले.

वाचा-
आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारतीय संघाच चार वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मुकाबला होणार आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये विजय मिळवल्यास ते त्यांचे पहिले टी-२० विजेतेपद ठरले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here