महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम सामन्याला काही मिनिटांतच सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा विश्वचषक जो संघ जिंकेल, त्यांच्यावर पैशांची बरसात आयसीसी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा-

बऱ्याचदा पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये दुजाभाव केल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. पण यावेळी जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांच्यावर पैशांची बरसता होणार असल्याचे दिसत आहे.

जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना ७.१३ कोटी रुपये मिळणार आहेत, तर जो संघ उपविजेता ठरणार आहे त्यांना ३.५८ कोटी रुपये मिळणार आहेत. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या प्रत्येक संघाला १२ लाख रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या संघांना पाच लाख रुपये मिळणार आहेत.

वाचा-

भारतीय महिला संघाने अखेर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काही वेळातच अंतिम फेरीचा सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर आव्हान असेल ते बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे. पण भारताला ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांना चांगला खेळ करावाच लागेल. पण त्यापेक्षाही त्यांना एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष द्यावे लागणार आहे. कारण ही गोष्ट केल्यास भारताला विश्वचषक जिंकण्याची एक नामी संधी असेल.
भारतीय संघ पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

एकूण सामने- १९
ऑस्ट्रेलिया- १३ विजय
भारत- ६ विजय

भारताचा स्पर्धेतील प्रवास
गट फेरी
>>ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय
>>बांगलादेशवर १८ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय
>>श्रीलंकेवर सात विकेटनी विजय
उपांत्य फेरी
>>इंग्लंडविरुद्ध पावसामुळे सामना रद्द

ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवास
गट फेरी
>>भारताकडून १७ धावांनी पराभव
>>श्रीलंकेवर ५ विकेटनी विजय
>>बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय
उपांत्य फेरी
>>दक्षिण आफ्रिकवर ५ धावांनी विजय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here