भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्याची मालिका उद्यापासून सुरू होणार आहे. पहिला वनडे सामना धर्मशाळा येथे उद्या होणार आहे. पण या सामन्यासाठी प्रेक्षकांची संख्या अगदीच अल्प असण्याची शक्यता आहे. पण यावेळी बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना सावध राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर या कालामधीमध्ये नेमक्या काय उपाय योजना करायच्या, हेदेखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
करोना वायरसपासून वाचण्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना सांगितलेले सात उपाय१. साबण आणि पाण्याने २० सेकंद हात धुवा
२.हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करा
३.शिंकताना किंवा खोकताना तोंडापुढे हात किंवा रुमाल धरा
४.सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षण दिसल्यास लगेच वैद्यकीय टीमशी संपर्क साधा
५.तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
६.अनोळखी ठिकाणी काहीही खाऊ नका
७. अनोळख्या व्यक्तीबरोबर हस्तांदोलन करू नका किंवा त्यांच्याबरोबर सेल्फी काढू नका
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्याची मालिका उद्यापासून सुरू होणार आहे. पहिला वनडे सामना धर्मशाळा येथे उद्या होणार आहे. पण या सामन्यासाठी प्रेक्षकांची संख्या अगदीच अल्प असण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसमुळे अनेकांनी सामना पाहण्याचा बेत रद्द केल्याचे दिसते.
हिमाचल प्रदेशची राजधानीपासून २५० किलो मीटर अंतरावर असलेल्या धर्मशाळा स्टेडियममध्ये २२ हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात. पण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यातील ४० टक्के तिकिटांची विक्री देखील झालेली नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २०१५ मध्ये अखेरची वनडे मालिका झाली होती. तेव्हा भारताने आफ्रिकेचा ३-२ असा पराभव केला होता. दोघांमध्ये आतापर्यंत ६ मालिका झाल्या असून त्यापैकी भारताने ४ तर आफ्रिकेने एका मालिकेत विजय मिळवला आहे. एक मालिका ड्रॉ झाली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times