वाचा-
आजच केंद्र सरकारने परदेशी खेळाडूंना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसच्या धोक्यामुळे ही स्पर्धाच रद्द करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. असे असताना देखील बीसीसीआयने मात्र ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार होणार असे म्हटले आहे.
वाचा-
आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक येत्या १५ मार्च रोजी होणार आहे. आयपीएल स्पर्धेसंदर्भात या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. करोनाचा धोका असल्यामुळे स्पर्धा रिकाम्या मैदानात घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अर्थात यावर बीसीसीआयकडून कोणतेच उत्तर अद्याप आलेले नाही. करोनाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या उपाय योजना करू, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने याआधीच म्हटले आहे.
वाचा-
आयपीएलमधील प्रत्येक संघात परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. जर परदेशी खेळाडूंनी सामना खेळला नाही तर त्याचा स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो.
वाचा-
दोन मार्ग आहेत बीसीसीआयकडे
या सर्व पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे स्पर्धा काही काळासाठी स्थगित करावी आणि नंतर त्याचे आयोजन करावे. दुसऱ्या पर्यायामध्ये सर्व सामने रिकाम्या मैदानात होतील आणि प्रेक्षक घरी टीव्हीवर सामने पाहतील. यामुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका निर्माण होणार नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times