भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना आज धरमशाला येथे सुरु होणार होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. याबाबत बीसीसीआयने काही अपडेट्स दिले आहेत.

मंगळवारपासून धर्मशाळा येथे पाऊस पडत आहे. बुधवारी देखील मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे भारतीय संघाला सराव करता आला नाही. हवामान विभागाने आज १०० टक्के पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान सामना व्हावा यासाठी हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे काही अधिकारी आणि स्थानिक लोकांनी येथील इंद्रुनाग मंदिरात प्रार्थना केली आहे. पण ही प्रार्थना फळाला आलेली दिसत नाही. कारण हा सामना रद्द करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे.

गेल्या वर्षा याच मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here