नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी चार खेळाडूंना रिटेन करत सर्वांनाच धक्का दिला. कारण यापूर्वी मुंबईचा संघ फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केल, असे मत वर्तवले जात होते. मुंबईच्या संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. रोहितबरोबर यावेळी मुबंई इंडियन्सने जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले आहे.

रिटेशनचे नियम होते तरी काय, जाणून घ्या…
आयपीएलमध्ये यावेळी मोठा लिलाव होणार आहे. प्रत्येक संघाला लिलावासाठी एकूण ९० कोटी रुपयांची मुभा दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम कोणताही संघ वापरू शकत नाही. पण एखाद्या संघाने जर चार खेळाडूंना रिटेन करायचे ठरवले तर त्यांच्याकडील ९० कोटींमधून ४२ कोटी रुपये वजा होणार आहेत. पण प्रत्येक संघाने चार खेळाडूंनाच रिटेन करायलाच हवे, असे काही नाही. जर एखाद्या संघाने तीन खेळाडूंना रिटेन केले तर त्यांचे ३३ कोटी रुपये खर्च होतील, त्याचबरोबर जर एखाद्या संघाने दोन खेळाडूंना रिटेन केले तर त्यांच्याकडील २४ कोटी रुपये खर्च होतील. समजा एखाद्या संघाने फक्त एकाच खेळाडूने रिटेन करायचे ठरवले तर त्यांना १४ कोटी रुपये खर्च करावे लागतील. जर एखाद्या अनकॅप खेळाडूला (म्हणजे जो देशाकडून राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळलेला नाही) एखाद्या संघाने रिटेन करायचे ठरवले तर त्यांच्याकडील ४ कोटी रुपये खर्च होतील. जर एखाद्या संघाने चार खेळाडूंना रिटेन करायचे ठरवले, तर पहिल्या खेळाडूला १६, दुसऱ्या खेळाडूला १२, तिसऱ्या खेळाडूला ८ आणि तिसऱ्या खेळाडूला ६ कोटी रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या खेळाडूने तीन खेळाडूंना रिटेन केले तर त्यांना पहिल्या खेळाडूला १५, दुसऱ्या खेळाडूला ११ आणि तिसऱ्या खेळाडूला ७ कोटी रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या संघाने दोनच खेळाडूंना रिटेन केले तर त्यांना पहिल्या खेळाडूला १४ आणि दुसऱ्या खेळाडूला १० कोटी रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या संघाने एकाच खेळाडूला रिटेन केले तर त्यांना १४ कोटी एवढी रक्कम त्या खेळाडूला द्यावे लागतील. त्यानुसारच हे रिटेशन बीसीसीआयने केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here