सध्याच्या घडीला जगभरात ‘करोना’ व्हायरसचा प्रसार झाला आहे आणि ही फार चिंतेची बाब आहे. पण भारतासाठी मात्र पुढील दोन आठवडे सर्वात महत्वाचे आहेत. कारण या दोन आठवड्यात आपण योग्य ते सहकार्य केले तर आपण हे सारे आटोक्यात आणू शकतो, असे विधान भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने केले आहे.

अश्विनने यावेळी ट्विटरच्या माध्यमाधून भारतातील लोकांना आवाहन केले आहे. तो म्हणाला की, ” आपल्या भारतवासियांसाठी दोन आठवडे सर्वात महत्वाचे आहे. या दोन आठवड्यांमध्ये आपण एकत्रित न येता घरीच राहिले पाहिजे. जर दोन आठवडे आपण योग्य ते खबरदारीचे उपाय करू तर लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत मिळू शकते.”

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. काही क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली. त्यानंतर आता आयपीएलही पुढे ढकलणार असल्याचे वृत्त हाती येत आहे. संचारबंदीनंतर आता एप्रिलमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार नसल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी सांगितले की, ” बीसीसीआय सध्याच्या घडीला सर्व गोष्टी पाहते आहे. त्यामुळे भारतामध्ये करोना व्हायरसमुळे कशी परिस्थिती आहे, याचे अवलोकन बीसीसीआय एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत करणार आहे. त्यानंतर आयपीएलबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येऊ शकतो. पण जर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर आयपीएलचा पहिला सामना झाला नाही तर आयपीएल रद्द करावी लागेल.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आयपीएल अजून पुढे ढकलण्यात येणार आहे. बीसीसीआय एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व गोष्टींवर नजर ठेऊन असेल. त्यामुळे सध्याच्या घडीला बीसीसीआयला आयपीएलबाब वेट अँड वॉच अशीच भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण आगामी दोन आठवडे भारतीयांसाठी महत्वाचे असल्याचे अश्विननेही सांगितले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांनंतर परिस्थितीमध्ये काही सुधारणा होते का, हे बीसीसीआयला पाहावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here