IND विरुद्ध SA पहिली कसोटी: भारत- दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (First Test Match) भारताने पहिल्या डावात 327 धावाचं केल्या आहेत. पहिल्या दिवशी 3 बाद 272 धावा केल्यानंतर भारताने 327 धावाच केल्याने भारताकडून पुन्हा एकदा चांगली सुरुवात होऊनही नंतर खास कामगिरी न झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानेही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कौतुक करत भारताचा महत्त्वाचा फलंदाज ऋषभ पंतच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कांबळीने तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच आज आफ्रिकन गोलंदाज चांगली कामगिरी करतील. असा अंदाज वर्तवला होता. तसंच झालं, भारताचे 7 गडी पटापट बाद झाले. पण यावेळी पंतने खास कामगिरी न केल्याने कांबळीने यावर प्रश्न उपस्थित केले. कांबळीच्या मते पंतला चांगल्या खेळीची संधी होती, त्याच्याकडून तशी अपेक्षाही संघाला होती. पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, यात त्याचा दोष आहे का? की आफ्रिकन गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली? असा प्रश्नही कांबळीने कू करत विचारला आहे.

भारताचा पहिला डाव

पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केली. त्याने अप्रतिम शतक झळकावत 123 धावा केल्या. तर मयांक अगरवालने 60 धावा केल्या. या दोघांनंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एका चिवट खेळीचं दर्शन घडवलं असून त्याने 102 चेंडूत 48 धावा केल्या आहेत. पण त्यानंतरचे सर्व फलंदाज बुमराह सोडता दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. बुमराहने केवळ 14 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या आहेत. तर आश्विन, ठाकूर आणि सिराज यांनी 4 धावा केल्या. त्यामुळे भारताचा डाव लवकरच आटोपला.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here