नवी दिल्ली: करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने ५१ कोटींची मदत करण्याची घोषणा केली आहे. करोनाचे संकट भारतात देखील आले असून ते दिवसेदिवस वाढत चालले आहे. केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा संकटाच्या काळात अनेक जण राज्य आणि केंद्र सरकारला आर्थिक मदत केली आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि अन्य अधिकाऱ्यांनी मिळून भारतीय लोकांच्या सुरक्षेसाठी आणि करोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ५१ कोटी देण्याची घोषणा केली आहे.

वाचा-
यासंदर्भातील माहिती बीसीसीआयने शनिवारी ट्वीटकरून दिली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अन्य खेळाडू आणि क्रीडा संघटना तसेच उद्योजग करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी मदत जाहीर करत असताना बीसीसीआय मात्र मागे का असा सवाल उपस्थित केला जात होता. यावरून अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले होते.

बीसीसीआयच्या या मदतीमध्ये देशातील अन्य राज्यातील क्रिकेट संघटनाचा देखील सहभाग आहे. यात मुंबई क्रिकेट असोसिएशनने ५० लाखांचे योगदान दिले आहे.

भारतीय क्रिकेटपटूंनी देखील करोनाविरुद्ध लढ्यात आर्थिक मदत केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५ लाख रुपये, तर गांगुलीने लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेलेल्यांसाठी ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय बॅडमिंटनपटू पीव्ही.सिंधूने १० लाख, तर अन्य खेळाडूंनी एक ते सहा महिन्यांचा पगार दिला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here