‘करोना’मुळे आता भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा आता धोक्यात आला आहे. हा दौरा सप्टेंबरमध्ये सुरु होणार होता. पण ऑस्ट्रेलियाने आता सहा महिने आपल्या सीमा बंद करायचे ठरवले आहे. त्यामुळे भारताचा हा दौरा आता धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या या दौऱ्यानंतर ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. जर ‘करोना’चा प्रसार असाच होत राहीला तर आयसीसीला ट्वेन्टी-२० विश्वचषकही रद्द करावा लागेल, असे म्हटले जात आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी चांगला सराव व्हावा, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याचे ठरवले होते. पण आता ऑस्ट्रेलियाने सहा महिने आपल्या सीमा बंद करायचे ठरवल्याने हा दौरा रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

‘करोना’मुळे बरेच दौरे रद्द करावे लागले आहे. भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ आला होता. दोन्ही देशांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर ‘करोना’मुळे ही मालिकाच बीसीसीआयला रद्द करावी लागली होती.

सध्याच्या घडीला आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतरही आयपीएल होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. आता १५ एप्रिलनंतर बीसीसीआय आयपीएलबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here