करोना व्हायरसचा धक्का क्रीडा जगताला बसला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी आयपीएल सध्या पुढे ढकलली गेली आहे. पण जर आयपीएल रद्द करण्यात आली तर खेळाडूंना ठरवलेले मानधन मिळणार नाही, असे समजते आहे.

आयपीएल रद्द झाली तर बीसीसीआय आणि संघ मालकांनाच धक्का बसणार नाही, तर खेळाडूंनाही मोठा फटका बसणार आहे. कारण जर आयपीएल खेळवली गेली नाही तर खेळाडूंना काहीच मानधन मिळणार नाही.

कसे मिळते खेळाडूंना मानधनआयपीएलमुळे खेळाडू करोडपती झाले. कारण त्यांच्यावर करोडोंची बोली लावून त्यांना संघ मालकांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पण या खेळाडूंना त्यांचे पैसे एकरकमी मिळत नाहीत. आयपीएल सुरु होण्याच्या आठवड्याभरापूर्वी त्यांना बोली लागलेल्या रक्कमेच्या १५ टक्के एवढी रक्कम दिली जाते. आयपीएल सुरु असताना खेळाडूंना ६५ टक्के एवढी रक्कम दिली जाते तर आयपीएल संपल्यावर खेळाडूंना उर्वरीत रक्कम दिली जाते.

खेळाडूचे कसे होणार नुकसानभारतीय क्रिकेटर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आयपीएल होणार की नाही, याबाबत काहीच सांगू शकत नाही. पण आयपीएल जर रद्द झाली तर त्याचा फटका संघ मालकांना बसणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय आणि प्रसारण करणाऱ्या कंपनीलाही मोठा फटका बसणार आहे. जर आयपीएल झाली नाही तर खेळाडूंनाही त्यांचे पूर्ण मानधन मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. यावेळी खेळाडूंच्या मानधनात कपातही केली जाऊ शकते.”

करोना व्हायरसचा मोठा फटका आयपीएललाही बसू शकतो. यंदा आयपीएल ही २९ मार्चपासून सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली. आता १५ एप्रिलला बीसीसीआयला परिस्थिती कशी आहे, याची पाहणी करेल. पण जर परिस्थिती सुधारली नाही तर कदाचित आयपीएल रद्द होऊ शकते किंवा पुढे ढकलण्यातही येऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here