करोना व्हायरस हा लोकांना कंगाल करून सोडणार, असे विधान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केले आहे. करोनामुळे लोकांचे जीव जात आहेत, पण त्यापेक्षा जास्त लोकं ही कर्जबाजारी होती, असे मत अख्तरने व्यक्त केले आहे.

करोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात ४० हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर लाखो लोकं करोनाबाधित आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. शोएबने आता एक ट्विट पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने करोना व्हायरसमुळे लोकांचे जीव जात आहेत, पण त्यापेक्षा जास्त लोकं ही कर्जबाजारी होतील, असे म्हटले आहे.

अख्तरने गेल्या काही दिवसांमध्ये करोना व्हायरसबाबत काही व्हिडीओ पोस्ट केले होते. या व्हिडीओमध्ये त्याने लोकांना आवाहनही केले होते. त्याचबरोबर त्याने करोना व्हायरसबाबत लोकांना माहितीही दिली होती. एका व्हिडीओमध्ये तर शोएबने सध्याच्या काळात जंक फूड खाण्यास विरोध केला होता.

सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण काही लोकांना हे लॉकडाऊन म्हणजे सुट्टी वाटत आहे आणि त्यानुसारच ते वागत असल्याचे दिसत आहे. अशा लोकांना शोएबने चांगलेच धारेवर धरले आहे. करोना व्हायरससाठी शोएबने काही दिवसांपूर्वी चीनला दोषी ठरवले होते. तुम्ही वटवाघूळ आणि माकड यासारखे प्राणी कसे काय खाऊ शकता, असा सवालही त्याने उपस्थित केला होता.

करोना व्हायरसचा फटका पाकिस्तानलाही चांगलाच बसलेला आहे. कारण त्यांना पाकिस्तान सुपर लीगचे काही सामने रद्द करावे लागले होते. त्याचबरोबर या लीगमध्ये खेळणाऱ्या एका परदेशी खेळाडूला करोना झाल्याचेही वृत्त प्रकाशित झाले होते. त्यामुळे काही परदेशी खेळाडूंनी आता यापुढे पाकिस्तान सुपर लीग खेळायची की नाही, याबाबत विचार करायला सुरुवात केली आहे. जर परदेशी खेळाडू पाकिस्तान सुपर लीग खेळायला आले नाहीत तर त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण यावर्षी पाकिस्तान सुपर लीगने नफा कमावला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here