मुंबई : बडोदा आणि चंदीगडमध्ये खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीदरम्यान रविवारी (२७ फेब्रुवारी) एक दुःखद घटना घडली. बडोद्याचा फलंदाज क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा संघ व्यवस्थापकाने त्याला ड्रेसिंग रूममध्ये बोलावले. जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, तेव्हा त्याला सांगण्यात आले की, त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

वाचा-

बडोदा संघाने सोलंकीला माघारी जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, पण त्याने संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला. वडिलांवर अंतिम संस्काराचे क्षण त्याने व्हिडिओ कॉलद्वारे पाहिले. बडोद्याचा कर्णधार केदार देवधरच्या म्हणण्यानुसार, सोलंकीला घरी जाण्यासाठी सर्व पर्याय खुले करण्यात आले होते, पण तो जरी घरी गेला असता, तरी वेळेवर घरी पोहोचू शकला नसता.

वाचा-

सोलंकीचे वडील गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सतत कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाही सोलंकीने रणजी सामना न सोडण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी मुलीलाही गमावले

काही दिवसांपूर्वीच सोलंकीने त्याच्या नवजात मुलीला गमावले. जन्मल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याची मुलगी हे जग सोडून गेली. त्यानंतर तो घरी गेला होता. मुलीचा अंत्यविधी आटोपल्यानंतर सोलंकी आपल्या संघाकडून खेळण्यासाठी परतला. संघात परतल्यावर त्याने अनिवार्य क्वारंटाईनमध्ये वेळ घालवला आणि त्यानंतर त्याने उत्कृष्ट शतक झळकावले. पहिला सामना न खेळलेल्या सोलंकीने चंदीगडविरुद्ध १०४ धावांची खेळी केली होती. आता काही दिवसातच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने सोलंकीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here