मुंबई: भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अनेकांना लग्झरी गाड्यांची आवड आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होतो तो म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा होय. रोहित शर्माने नुकतीच एक महाग लग्झरी गाडी घेतली असून त्यामुळे तो चर्चेत आलाय. जाणून घेऊयात त्याच्या नव्या गाडीबद्दल…

वाचा- भारत x श्रीलंका: रोहित शर्माला अबाधित ठेवायचाय ‘हा’ विक्रम

हिटमॅन रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत असताना तो चर्चेत आलाय त्याच्या नव्या गाडीमुळे, रोहितने lamborghini Urus ही नवी गाडी खरेदी केली आहे. ही लग्झरी गाडी फक्त ३-४ सेंकदात १०० किलो मीटर प्रतितास इतका वेग पकडते. रोहितने खरेदी केलेल्या या गाडीचा रंग हा भारतीय क्रिकेट संघाच्या जर्साच्या रंगा प्रमाणे आहे.

वाचा- विराट कोहलीच्या १००व्या कसोटीसाठी BCCIने निर्णय मागे घेतला

रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माने खरेदी केलेल्या या नव्या गाडीची किमत ३.१५ कोटी इतकी आहे. या गाडीचा रंग डार्क ब्ल्यू किंवा Blu Eleosअसा आहे. हाच रंग भारतीय संघाच्या जर्साचा देखील आहे. रोहितने खरेदी केलेली ही पहिली महाग गाडी नाही. याआधी त्याने BMW M5 ही गाडी खरेदी केली होती. त्याचा रंग देखील ब्ल्यू होता. या शिवाय त्याच्याकडे Toyota Fortuner, Mercedes GLS 350d, BMW5 आणि BMWX3 या महाग गाड्या आहेतच.

वाचा- रोहित शर्माचे ट्विटर अकाउंट हॅक? पोस्ट होत आहेत विचित्र मेसेज

Lamborghini Urus बद्दल सांगायचे झाले तर त्याच्यामध्ये ४.४ लीटरचे टर्बोचार्ज्ड v8 इंजिन आहे. त्याचे मोटर ६४१ bhpचे मॅक्सिमम पॉवर आणि ८५० Nmचे पीक टॉर्क जनरेट करते. या गाडीचे इंजिन ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे आहे. ही गाडी जगातील सर्वात वेगवान SUV गाड्यांपैकी एक आहे. ३०५ किलोमीटर प्रती तास हा या गाडीचा टॉप स्पीड आहे. फक्त ३.६ सेंकदात ० ते १०० इतका वेग पकडते.

वाचा- विश्वविजेत्या न्यूझीलंडचा लाजिरवाणा पराभव; ९० वर्षानंतर देखील स्वप्न पूर्ण

गेल्या काही महिन्यात रोहित शर्मावर भारतीय संघातील जबाबदारी वाढवण्यात आली आहे. प्रथम त्याला टी-२० संघाचे कर्णधार करण्यात आले. त्यानंतर वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि आता कसोटीचे कर्णधारपद देखील त्याच्याकडे दिले गेले. रोहित शर्मा संघाचा नियमीत कर्णधार झाल्यापासून भारताने एकही मॅच गमावलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम न्यूझीलंड, नंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा मर्यादीत षटकांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला. भारतीय संघ टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. माजी कर्णधार धोनीनंतर संघाला अव्वल स्थानी पोहोचवणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार आहे.

वाचा-सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला…

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here