पंजाबमधील जालंधर येथे सध्या बिकट अवस्था आहे. कारण बहुतांशी लोकांना अन्न-धान्याचा पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पण या कुटुंबियांसाठी हरभजन हा देवदूत ठरला आहे. जालंधर येथील पाच हजार कुटुंबियांच्या अन्न-धान्याच्या प्रश्न हरभजनने सोडवला आहे.
याबाबत हरभजन म्हणाला की, ” सध्याच्या घडीला काही कुटुंबियापुढे अन्न-धान्याचा प्रश्न बिकट होत चालला होता. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्न-धान्य कसं मिळेल, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या पाच हजार कुटुंबियांचा अन्न-धान्याचा प्रश्न आम्ही तुर्तास सोडवला आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना आहे.”
सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी गांगुली आता थेट रस्त्यावर उतरला आहे.
गांगुलीने आता २० हजार गरजू लोकांना जेवण देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गांगुली आता २० लोकांना जेवण देण्यासाठी पुढे आला आहे. गांगुलीने यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय केल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून गांगुली लोकांना मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ४९भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, झहीर खान, पीव्ही सिंधू, विश्वनाथन आनंद, हिमा दास, नीरज चोप्रा, मेरी कोम, विनेश फोगट, मनु भाकर या काही खेळाडूंचा समावेश होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times