सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात देशवासियांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे. पण यावेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा भारत सरकार आणि बीसीसीआयने केली आहे.

करोना व्हायरसमुळे भारतातील काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत, तर यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सध्याच्या घडीला देशामध्ये कोणतीही क्रीडा स्पर्धा सुरु नाही. भारतामध्ये क्रिकेट सर्वाधिक खेळले जाते, असे म्हटले जाते. पण सध्या भारतामध्येही क्रिकेट सुरु नाही. यामुळे क्रिकेट चाहते निराश आहेत. पण भारतातील क्रिकेट चाहत्यांनी निराश होऊ नये, यासाठी आता सरकारने एक ठोस पाऊल उचलले आहे.

सध्याची देशाची स्थिती पाहता क्रीडा स्पर्धा लवकर होतील, असे दिसत नाही. त्यामुळे यंदाचे आयपीएल रद्द करावे लागू शकते किंवा अजून पुढे ढकलले जाऊ शकते. त्यामुळे चाहत्यांना विरंगुळा देणारा क्रिकेट हा खेळ कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

भारतातील चाहत्यांना लाईव्ह क्रिकेट पाहायला आवडते, पण त्यांना जुन्या क्रिकेटच्या आठवणींमध्येही रमायला आवडते. हीच गोष्ट भारत सरकारने जाणली आहे. त्यामुळे आता डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर भारत सरकार आणि बीसीसीआय यांनी एकत्रित येऊन काही जुने सामने दाखवायचे ठरवले आहे. हे सामने २००० सालच्या आसपासचे असतील, असेही म्हटले जात आहे.

सध्या देशातील गरजू लोकांसाठी आता क्रिकेटपटूही पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. इरफान आणि युसूफ हे पठाण बंधू, भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग हे सध्या गरजूंना मदत करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये ज्यांचे पोट हातावर आहे, जे दिवसाच्या पगारावर काम करतात त्यांच्यावर उपासमारीचा वेळ येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आता हे पठाण बंधू पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला गरजू लोकांना अन्न-धान्यांची जास्त गरज आहे. हे पाहता पठाण बंधूने आता अन्नदान करायचे ठरवले आहे. पठाण बंधूंनी १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाट्याचे वाटप केले आहे. बडोदा येथील काही गरजू लोकांना अन्न-धान्याची निकड भासत होती. त्यासाठी आता पठाण बंधू मदतीचा हात देताना दिसत आहेत.

गांगुलीने आता २० हजार गरजू लोकांना जेवण देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार गांगुली आता २० लोकांना जेवण देण्यासाठी पुढे आला आहे. गांगुलीने यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय केल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून गांगुली लोकांना मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढे सरसावला आहे. तब्बल पाच हजार कुटुंबियांना तो अन्न-धान्य पुरवत असल्याचे दिसत आहे. पंजाबमधील जालंधर येथे सध्या बिकट अवस्था आहे. कारण बहुतांशी लोकांना अन्न-धान्याचा पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पण या कुटुंबियांसाठी हरभजन हा देवदूत ठरला आहे. जालंधर येथील पाच हजार कुटुंबियांच्या अन्न-धान्याच्या प्रश्न हरभजनने सोडवला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here