मुंबई: करोना व्हायरसमुळे स्पर्धा नियोजित वेळेत होईल असे वाटत नाही. बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली असली तरी त्यानंतर पण आयोजन होईल की नाही बद्दल शंकाच आहेत. देशात करोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही स्पर्धा होईल याबाबत कोणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. स्पर्धा झाली नाही तर त्याचा परिणाम भारतीय क्रिकेटपटूंच्या कमाईवर होणार आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाल्यामुळे बीसीसीआयला दोन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. या नुकसानीचा परिणाम खेळाडूंवर होणार.

वाचा-
बीसीसीआयच्या उत्पन्नाचा आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मानधनाचे सूत्र अशा प्रकारे आहे की बोर्डाला होणाऱ्या उत्पन्नाचा २६ टक्के हिस्सा क्रिकेटपटूंना जातो. यापैकी १३ टक्के आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्यांना तर अन्य हिस्सा घरगुती आणि ज्युनिअर क्रिकेटपटूंना दिला जातो.

वाचा-
बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोर्डाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यास त्याचा फटका कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य गोष्टींवर होईल. त्यामुळे होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबत केलेल्या वार्षिक करारानुसार कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना ए-प्लसमध्ये ठेवण्यात आले आहे. या तिघांना ७ कोटी पगार दिला जातो. तर ए कॅटगरीमध्ये आर.अश्विन, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि अन्य खेळाडू आहेत ज्यांना ५ कोटी मिळतात.

वाचा-
बी कॅटगरीमध्ये हार्दिक पांड्या, मयांक अग्रवालसह अन्य काही खेळाडू आहेत. ज्यांना वर्षाला ३ कोटी इतका पगार मिळतो. तर श्रेयस अय्यर, हनुमा विहारी यांना वर्षाला १ कोटी रुपये दिले जातात. यावर्षी बीसीसीआयने वार्षिक करारातून माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला वगळले आहे. तर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वर्षाला ९ कोटीहून अधिक पगार दिला जातो. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना एका कसोटी सामन्यासाठी १५ लाख, वनडे साठी ७ लाख तर टी-२० साठी ५ लाख रुपये दिले जातात.

वाचा-
रणजी खेळाडूंना प्रत्येक दिवसासाठी ३५ हजार, वनडे आणि टी-२० साठी ५० हजार रुपये देते. आता करोनामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे बोर्ड रिटेशनशिफ फी मध्ये कपात करते की मॅच फी मध्ये कपात करते हे पाहावे लागले. बोर्ड प्रत्येक वर्षी जवळपास १५० कोटी रुपये आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देते. तर ७० कोटी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांना दिले जाते. जर आयपीएल झाली नाही तर त्याच फटका खेळाडूंच्या कमाईवर होणार.

वाचा-

सर्वाधिक नुकसान कोणाचे
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंना सर्वाधिक फटका बसू शकतो. या तिनही खेळाडूंना त्यांच्या संघांनी १० ते १८ कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे. आयपीएल रद्द झाली किंवा त्याचे स्वरुप बदलले तरी खेळाडूंच्या कमाईवर त्याचा परिणाम होईल.

वाचा-
करोना व्हायरसमुळे याआधी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा पगार कमी करण्यात आला आहे. फक्त क्रिकेटपटूंच नाही तर फुटबॉलमध्ये देखील स्टार खेळाडूंचा पगार कमी केला आहे. यात लियोनेल मेसी सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंड बोर्डाने खेळाडूंच्या पगारातील ५० हजार पाऊंड करोनाग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले आहे. मेसी आणि बोर्सिलोनामधील खेळाडूंचा ७० टक्के पगार कपात होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here