सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. करोनाचा फटका इंग्लंडलाही बसलेला आहे. त्यामुळेच जर लॉकडाऊन योग्यपद्धतीने पाळले गेले नाही तर काय परिणाम होऊ शकतात, हे या खेळाडूला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या खेळाडूने मोदी यांचा लॉकडाऊनचा सल्ला गंभीरपणे घ्यावा, असे आवाहन भारतीयांना केले आहे.
मोदी यांनी भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन ठेवले आहे. पण तरीही काही लोकं या गोष्टीला गंभीरपणे घेताना दिसत नाहीत. त्यामुळे इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीयांना हा सल्ला दिला आहे.
हा खेळाडू आहे तरी कोणइंग्लंडच्या कोणत्या खेळाडूला भारताबद्दल एवढे ममत्व वाटत आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हा खेळाडू भारतीय वंशाचा आहे. या खेळाडूचे नाव आहे माँटी पनेसार. इंग्लंडकडून या फिरकीपटूने ५० कसोटी आणि २६ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.
काय म्हणाला हा खेळाडूकरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण सर्व एकत्र आलो तर या लढ्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सल्ला सर्व भारतीयांनी गंभीरपणे घ्यायला हवा, असे पनेसारने सांगितले आहे.
आयपीएलवरही परीणाम
यंदाची आयपीएल स्पर्धा ही २९ मार्चपासून सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १४ एप्रिलला भारत सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा कार्यकाळ संपत असल्याने आयपीएलबाबतची घोषणा १५ एप्रिलला होणार होती. पण सध्याचे वातावरण पाहता १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल, असे वाटत नाही. कारण परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कोणतीही स्पर्धा भारतामध्ये खेळवण्यात येणार नाही. त्यामुळे आयपीएलच्या चाहत्यांना थोडा काळ अजून कळ सोसावी लागेल, असेच दिसत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times