सामन्यात नेमकं काय घडलं?

विजयासाठी ६ चेंडूत ३६ धावांची गरज असताना रोवमॅन पॉवेलने पहिल्या ३ चेंडूवर षटकार मारले. पण तिसरा चेंडू टाकल्यानंतर वादाला सुरूवात झाली. ओबेद मॅककॉयने टाकलेला फुलटॉस चेंडू नो बॉल देण्याची मागणी दिल्लीने केली. ही मागणी मैदानावरील अंपायर्सने फेटाळून लावली. दिल्लीने तिसऱ्या पंचाकडून चेक करण्याची मागणी केली पण मैदानावरील अंपायर्सनी ती मान्य केली नाही. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने दोन्ही फलंदाजांना पॉवेल आणि कुलदीप यादव यांना मैदानातून बाहेर येण्याचा इशारा केला.

चीटर-चीटर म्हणून घोषणाबाजी

पंतने केलेल्या इशाऱ्यानंतर संघातील अन्य सदस्यांनी फलंदाजांना बाहेर येण्यापासून रोखले. पण प्रकरण तेवढ्यात शांत झाले नाही. संघाचे फलंदाजीचे कोच प्रवीण आमरे मैदानात घुसले आणि अंपायर्सशी वाद घालू लागले. इतक सर्व झाल्यानंतर देखील दिल्लीची मागणी मान्य झाली नाही. अखेर प्रवीण आमरे मैदानाबाहेर गेल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. या सर्व प्रकरणानंतर वानखेडेवरील उपस्थित प्रेक्षकांनी चीटर-चीटर म्हणून घोषणाबाजी सुरू केली. त्याआधी राजस्थानने जोस बटलरच्या ११६ धावांच्या जोरावर २२२ धावांचा डोंगर उभा केला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here