करोना व्हायरसशी लढा जगभरात सुरु आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा करोना हा शत्रू आहे. त्यामुळे करोनाला हरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने एकत्र यायला हवे. आपल्यामधील एकजूट आपण दाखवायला हवी, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे.

करोनाचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. या लढ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून मिळू शकते. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी जो मदत निधी लागेल, तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भरवून मिळवता येऊ शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होते. या गोष्टीचे समर्थन आफ्रिदीने केले आहे.

याबाबत आफ्रिदी म्हणाला की, ” सध्याच्या घडीला जर मदतनिधी हवा असेल तर त्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने खेळवण्यास विरोध कशाला असायला हवा. दोन्ही देशांना क्रिकेटने जवळ आणले आहे. त्यामुळे जेव्हा शोएबच्या प्रस्तावाला भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि राजीव शुक्ला यांनी विरोध केला तेव्हा मला त्यांचे आश्चर्य वाटले. सध्याच्या घडीला शोएब जे काही म्हणाला ते चु़कीचे नाही आणि ते समजून घेण्याची गरज आहे.”

आफ्रिदी म्हणतोय, मोदी सरकार नकारात्मक…पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. मोदी सरकार हे नकारात्मक आहे, असे खळबळजनक वक्तव्य आफ्रिदीने केले आहे.

नेमके घडले तरी कायकरोनाशी लढण्याठी जो मदतनिधी लागेल तो आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून जमा करू शकतो, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला होता. यानंतर शोएबवर भारतातून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर शोएबने मात्र हा विषय काढला नाही. पण आता मात्र आफ्रिदीने या विषयाला हात घातला आहे. “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जोडणारा क्रिकेट हा एक दुवा आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवाया हवे,” असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे.

मोदींबाबत आफ्रिदी काय म्हणाला…आफ्रिदीने यावेळी मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. आफ्रिदी म्हणाला की, ” पाकिस्तानला नेहमीच भारताबरोबर खेळायचे असते. पण मोदी सरकारमध्ये प्रचंड नकारात्मकता आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिका होत नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेबाबत आम्ही नेहमीच सकारात्मक असतो, पण भारत सरकार याबाबत नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवली जात नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here