लाहोर: उठल्याबसल्या भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीयांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शोएब अख्तरचे करिअर सुरू होण्याआधीच संपले असते. भारताचे क्रिकेट प्रशासक यांनी मदत केली नसती तर अख्तरचे करिअर लवकर संपले असते, असा मोठा खुलासा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका माजी अध्यक्षाने केला आहे.

वाचा-
पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज जो रावळपिंडी एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध आहे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अख्तर भारत-पाक क्रिकेट आणि भारतीय खेळाडूंबद्दल बेताल वक्तव्य करत आहे. शोएबच्या करिअर संदर्भात एक मोठा खुलासा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माजी अध्यक्षाने केला आहे.

वाचा-
शोएबने १९९७ मध्ये रावळपिंडी मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय करिअरला सुरूवात केली होती. शोएबचे हे करिअर २०००-०१ मध्येच संपले असते. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते जगमोहन डालमिया यांनी त्याचे करिअर संपण्यापासून वाचवले.

१९९९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला शोएब अख्तरच्या गोलंदाजीची तपासणी सुरू असल्याचे कळवले होते. तेव्हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन डालमिया १९९७-२००० या काळात आयसीसीचे अध्यक्ष होते.

वाचा-
यासंदर्भात बोलताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तौकीर जिया म्हणाले, जगमोहन यांचा आयसीसीमध्ये वजन होते. शोएब अख्तरच्या गोलंदाजी प्रकरणी त्यांनी प्रचंड सहकार्य केले. आयसीसीचे सर्व सदस्य शोएबची गोलंदाजीची अॅक्शन चुकीची असल्याचे सांगत होते. पण डालमिया यांना ते मान्य नव्हते आणि त्यांनी स्वत:ची बाजू लावून धरली.

वाचा- ; पण वर्ल्ड कप झाला पाहिजे

जिया १९९९ ते २००३ या काळात पीसीबीचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, डालमिया यांनी माझ्या सोबत शोएबची बाजू लावून धरली. डालमियांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच आयसीसीला हे मान्य करावे लागले की, अख्तरच्या उजव्या हातात जन्मजात दोष आहे आणि त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यास द्यावी.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here