करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे बहुतांशी लोकं घरी बसून आहे आणि त्यांच्या हाताला कोणतेही काम मिळताना दिसत नाही. काही लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तर काही लोकांना अजूनही पगार मिळालेला नाही. पण क्रिकेट संघातील खेळाडूंना मात्र जानेवारी महिन्यापासून पगार मिळाला नसल्याचे धक्कादायक वृत्त सममोर आले आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे बरेच देश आर्थिक संकटात सापडलेले आहेत. बऱ्याच देशांचे आणि क्रीडा संघटनांचे करार रद्द झाले आहेत. हे करार मार्चमध्ये संपत असतात. मार्चनंतर करोना व्हाय़रसमुळे जवळपास सर्वच देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणतीही क्रीडा स्पर्धा सुरु होताना दिसत नाही. सर्व स्पर्धा रद्द केल्या गेल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. जर कोणतीही स्पर्धा होणार नसेल तर क्रीडा मंडळांची करार का करायचा, असा विचार काही कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांची मिळकत बंद झाली आहे आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ आर्थिक संकटात सापडल्याचे म्हटले जात आहे. कारण जानेवारीपासून त्यांनी आपल्या खेळाडूंना पगार दिला नसल्याचे वृत्त समोर आले आहे. जानेवारीमध्ये वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यामध्ये सामने झाले होते. त्यानंतर श्रीलंकेबरोबर त्यांनी तीन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळले होते. वेस्ट इंडिजचा महिला संघ ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात चार सामने खेळला होता. पण या सामन्यांचे मानधन त्यांना अजून दिलेले नाही, असेही वृत्त आहे.

याबाबत वेस्ट इंडिजमधील खेळाडूंच्य संघटनेचे सचिव वेन लुईस यांनी सांगितले की, ” खेळाडूंना पगार आणि भत्ते मिळत आहेत. पण ज्या खेळाडूंना बोर्डाने संघात कायम ठेवले आहे त्यांच्या पगाराची काही समस्या आहे. स्थानिक सामन्यांमध्ये खेळल्यानंतर त्यांना पगार मिळालेला नाही, असे म्हटले जात आहे.”

सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा मोठा फटका बीसीसीआयला बसला आहे. बीसीसीआयला एकदिवसीय मालिका रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर आता आयपीएल अनिश्चित कालासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता विश्वचषक होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक ही क्रिकेटची मोठी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा आता पुढच्या वर्षी खेळवावी, असे मत एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here