सध्याच्या घडीला करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. काही स्पर्धा रद्द केल्या आहेत तर काही स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. पण चाहत्यांसाठी या काळातही एक खूष खबर आहे. ही खूष खबर म्हणजे येत्या शनिवारपासून क्रिकेट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शनिवारी क्रिकेटचा महामुकाबला पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

करोना व्हायरसमुळे क्रिकेट विश्वचषकावर संक्रांत कोसळू शकते, असे म्हटले जात आहे. आयपीएल तर सध्याच्या घडीला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही देशात क्रिकेट स्पर्धा सुरु नाहीत. पण या गोष्टीला एक देश मात्र अपवाद ठरला आहे. त्यांनी येत्या शनिवारी एक महामुकाबला खेळवण्याचे ठरवले आहे.

शनिवारी कुठे आणि कोणता सामना होणारसध्याच्या घडीला कोणतीही क्रीडा स्पर्धा सुरु नाही, असे तुम्हाला वाटत असेल. पण तसे मात्र नाही. जगातील काही देशांमध्ये करोना पसरलेला नाही. त्यामुळे त्यांना क्रीडा स्पर्धा खेळवण्याचे ठरवले आहे. येत्या शनिवारी वुआनताऊ या देशात क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

कोणामध्ये होणार सामनावुआनताऊ देशाच्या क्रिकेट संघटनेने शनिवारी अंतिम सामना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना वुआनताऊ क्रिकेटच्या फेसबूकवर लाईव्ह पाहता येणार आहे. या सातमन्यात टायफा ब्लॅकबर्ड आणि पॉवर शार्क्स हे दोन महिला संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत. पुरुषांचा एक प्रदर्शनीय सामनाही यावेळी खेळवला जाईल.

करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे बहुतांशी लोकं घरी बसून आहे आणि त्यांच्या हाताला कोणतेही काम मिळताना दिसत नाही. काही लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तर काही लोकांना अजूनही पगार मिळालेला नाही. पण क्रिकेट संघातील खेळाडूंना मात्र जानेवारी महिन्यापासून पगार मिळाला नसल्याचे धक्कादायक वृत्त सममोर आले आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे बरेच देश आर्थिक संकटात सापडलेले आहेत. बऱ्याच देशांचे आणि क्रीडा संघटनांचे करार रद्द झाले आहेत. हे करार मार्चमध्ये संपत असतात. मार्चनंतर करोना व्हाय़रसमुळे जवळपास सर्वच देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणतीही क्रीडा स्पर्धा सुरु होताना दिसत नाही. सर्व स्पर्धा रद्द केल्या गेल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. जर कोणतीही स्पर्धा होणार नसेल तर क्रीडा मंडळांची करार का करायचा, असा विचार काही कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांची मिळकत बंद झाली आहे आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here