लॉकडाऊनमुळे सध्याच्या घडीला सर्व क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना सराव करायलाही मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व खेळाडू घरीच बसून आहेत. आता पुन्हा क्रिकेट सुरु कधी करायचे, याबाबात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

आज, गुरुवारी आयसीसीने एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्या काय परिस्थिती आहे, त्याचबरोबर जर क्रिकेट सुरु करायचे असेल तर त्यासाठी नेमके काय करायला हवे, याबाबत या आयसीसीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

जर क्रिकेट सुरु करायचे झाले तर परिस्थिती कसे असायला हवी, याचा अंदाज आयसीसी घेणार असल्याचे समजते. सध्याच्या घडीला सर्वच क्रिकेटच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ऑक्टोबरपासून सुरु होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा की पुढे ढकलायचा, या निर्णयाची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.

आयसीसीच्या कार्यकारी समितीची बैठक आज झाली. या बैठकीमध्ये आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीच्या पीटर हारकोर्ट यांनाही बोलावण्यात आले होते. पीटर यांच्याशी आयसीसीच्या कार्यकारी समितीने चर्चा केली आणि त्यांना परिस्थितीचा आढावा यापुढेही घेण्याचे सांगण्यात आले.

याबाबत आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ” आयसीसीची ही बैठक कार्यकारी समितीसाठी होती. पण या बैठकीमध्ये वैद्यकीय सल्लागार समितीच्या पीटर यांना आमंत्रित करण्यात आले होते. पीटर यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी पीटर यांनी काही गोष्टी कार्यकारी समितीला स्पष्ट केल्या आहेत. पीटर यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा धोका जवळपास सर्वच देशांना आहे. पण सर्व परिस्थितीची पाहणी करत आहोत. क्रिकेट नेमके सुरु कधी करायचे, याबाबत मी भाष्य करू शकत नाही. पण क्रिकेट सुरु करण्यासाठी परिस्थिती ही सामान्य असायला हवी. कोणताही धोका पत्करुन स्पर्धा सुरु करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे चांगल्या वातावरणात आपण स्पर्धेचे आयोजन करावे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here