Authored by Maharashtra Times | Updated: Jul 4, 2022, 8:35 PM

भारताला इंग्लंडची पहिली विकेट मिळवण्यासाठी जास्त वेळ लागला. कारण इंग्लंडच्या दोन्ही सलामीनीरांनी दमदार फलंदाजी करत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. भारताने पहिली विकेट १०७ धावांवर मिळवली. भारताला पहिली विकेट मिळवण्यात एवढा जास्त वेळ का लागला, कर्णधार बुमराकडून कोणती चूक घडली आणि त्याने नेमकं काय करायला हवं होतं, जाणून घ्या मोलाची गोष्ट…

 

पहिली विकेट (सौजन्य-ट्विटर)

हायलाइट्स:

  • भारताला पहिली विकेट मिळाली ती १०७ धावांवर.
  • भारताला पहिली विकेट मिळवण्यात जास्त वेळ लागला
  • कर्णधार बुमराने यावेळी कोणती रणनिती वापरायला हवी होती, जाणून घ्या…
बर्मिंगहम : भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी मोठे आव्हान ठेवले असले तरी त्यांना पहिली विकेट मिळवण्यासाठी जास्त वेळ लागला. कारण भारताला पहिली विकेट मिळाली तेव्हा इंग्लंडचे धावांचे शतक पूर्ण झाले होते. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकी भागादीरी रचल्यावर भारताला पहिले यश मिळवता आले. पण भारताला पहिली विकेट मिळवण्यासाठी एवढा उशिर का लागला, याचे कारण आता समोर आले आहे.
भारताला पहिली विकेट मिळवण्यासाठी जास्त वेळ का लागला, जाणून घ्या…
भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान ठेवले तेव्हा टीम इंडियाचे गोलंदाज लवकर विकेट मिळवतील आणि यजमानांना दडपणाखाली आणतील, असे वाटत होते. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या हातात नवीन चेंडू होता. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरासारखे अनुभवी गोलंदाज सारथ्य करण्यासाठी मैदानात उतरले होते. बुमराने पहिल्या डावात इंग्लंडला सुरुवातीलाच तीन धक्के दिले होते, पण त्याला ही गोष्ट दुसऱ्या डावात करता आली नाही. दुसऱ्या डावातील पहिल्या स्पेलमध्ये एकही विकेट बुमराला मिळवण्यात आली नाही. त्याचबरोबर शमीलाही पहिल्या स्पेलमध्ये इंग्लंडला धक्का देण्यात अपयश आले. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात, पण त्यामध्येही जो तग धरून राहतो तोच यशस्वी कर्णधार ठरत असतो. पण बुमराने त्यानंतर एक चूक केल्याचे पाहायला मिळाले.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर आक्रमक फलंदाजी करत धावा वसूल करत होते, तेव्हा बुमराने वेगवान मारा सुरु ठेवायला हवा होता आणि चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकत निर्धाव काढण्याची रणनिती आखायला हवी होती. कारण जर चेंडू निर्धाव जायला सुरुवात झाली असती तर इंग्लंडचे सलामीवीर चुकीचे फटके मारण्यासाठी गेले असते आणि भारताला विकेट मिळू शकली असती. पण ही रणनिती आखण्यात बुमरा अपयशी ठरला आणि त्यामुळेच इंग्लंडच्या सलामीवीरांना शतकाची वेस ओलांडता आली. दोन वेगवान गोलंदाजांना अपयश आले असले तरी त्यानंतर कर्णधार बुमराने मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना गोलंदाजीसाठी पाचारण करायला हेवे होते. पण ही गोष्ट बुमराने केली नाही. बुमराने त्यावेळी रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी स्थिरस्थावर होण्यासाठी त्याच्या गोलंदाजीचा वापर केला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : why team india took so long to get the first wicket of england in edgbaston test , know the big reason …
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here