कोलकाता: भारतीय संघाचे माजी कर्णधार यांचे कोलकाता येथे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९९६ साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. विशेष म्हणजे गोस्वामी यांनी बंगाल कडून प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले होते.

वाचा-
प्रकृती खराब झाल्याने गोस्वामी यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. गोस्वामी यांनी देशाला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले होते. तर १९६४च्या स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

वाचा-
ते मोहन बागान क्लबकडून खेळत असे. १९५७ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या २७व्या वर्षी १९६४ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.

वाचा-
फक्त फुटबॉलच नाही तर गोस्वामी क्रिकेटमध्ये देखील यशस्वी झाले होते. ते बंगाल संघाकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळले होते. १९७१-७२ साली त्यांच्या नेतृत्वाखाली बंगाल संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण तेव्हाच्या बॉम्ब संघाने त्यांचा फायनल मध्ये पराभव केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here