चूनी गोस्वामी यांनी भारतासाठी जवळपास ५० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी स्पर्धात्मक फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. कारण वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी मोहन बागान या नामांकित संघाच्या कनिष्ठ गटात प्रवेश मिळवला होता. चूनी गोस्वामी यांचा जन्म सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या किशोरगंज येथे झाला होता. लहानपणापासून त्यांना फुटबॉलची आवड होती. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ताही होती. त्यामुळे त्यांना स्पर्धात्मक स्तरावर चांगले यश मिळाले होते.
वाचा-
चूनी गोस्वामी यांनी १९५६ ते १९६४ या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. चूनी गोस्वामी हे भारतीय संघाचे कर्णधार असताना त्यांनी देशाला १९६२ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून दिले होते. त्यामुळे त्यांची ख्याती फुटबॉल विश्वात पसरली होती. चूनी गोस्वामी यांना यावेळी पीके बॅनर्जी आणि तुलसीदास बालाराम यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळेच या तिघांनी मिळून इतिहास लिहिला होता. चूनी गोस्वामी हे बऱ्याच खेळाडूंचे प्रेरणास्थान होते. बऱ्याच खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शनही केले होते. बऱ्याच खेळाडूंना घडवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.
क्रिकेट संघाचेही होते कर्णधारचूनी गोस्वामी हे भारताच्या फुटबॉल संघाचे कर्णधार होते. पण त्यांनी बंगालच्या क्रिकेट संघाचेही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नेतृत्व केले आहे. फुटबॉलला सोडचिठ्ठी दिल्यावर त्यांनी आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला होता. चूनी गोस्वामी यांनी १९६२ ते १९७३ या ११ वर्षांच्या कालावधीत बंगालच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्वही केले होते. चूनी गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली बंगालचा संघ १९७१-७२ या हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. पण अंतिम फेरीत त्यांना अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times