यंदा आयपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होती, पण लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. भारतात पहिल्यांदा १४ एप्रिलपासून लॉकडाऊन असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आयपीएबाबतचा निर्णय १५ एप्रिलला घेण्यात येणार होता. पण १५ एप्रिलला आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या वर्षी आयपीएल होणार की नाही, याबाबतत संभ्रम आहे. कारण या वर्षी होणारा आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतही अजून स्पष्टता मिळालेली नाही. या स्पर्धा होणार की नाहीत, याबाबत अजून कोणताही माहिती पुढे आलेली नाही. पण आयपीएल मात्र या वर्षी होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे य स्पर्धा रद्द झाल्या तर आयपीएल कशी खेळवता येईल, आसा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. या दोन्ही स्पर्धेसाठी काही देश एकत्र येतील, त्यामुळए सर्व देशांचा विमान प्रवास, त्यांचे राहणे आणि खेळवणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे. पण आयपीएलचे मात्र तसे नाही. आयपीएल ही एकाच देशात खेळवली जाते. त्याचबरोबर आयपीएलसाठी २-३ शहरं ठरवण्यात आली तर स्पर्धा खेळवणे अधिक सोपे होऊ शकते, असेही म्हटले जात आहे.
myteam11 ने यावर्षी आयपीएल होणार की नाही, याबाबत एक सर्वे केला होता. या सर्वेमध्ये १० हजार जणांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेमधून ६० टक्के लोकांनी या वर्षी आयपीएल खेळवली जाईल, असे म्हटले आहे. त्याचबरोबर १३ टक्के लोकांनी आयपीएल प्रेक्षकांविना खेळवावी, असाही कौल दिलेला आहे. त्यामुळे या वर्षी आयपीएल खेळवण्यात येणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times