ही गोष्ट आहे भारताच्या एका युवा खेळाडूची. लहानपणी घरात गरीबी होती, त्यामुळे त्याच्याकडे बूट घ्यायलाही पैसे नव्हते. पण आपण काही तरी नक्कीच करून दाखवणार ही दुर्दम्य इच्छाशक्ती नक्कीच होती. त्या जोरावर हा खेळाडू खेळत राहीला आणि आता तर थेट भारतीय संघाला एक भाग झाला आहे.
गरीबीचे दिवसजेव्हा हा क्रिकेटपटू १५ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे स्पर्धात्मक क्रिकेट सुरु झाले होते. त्यावेळी क्रिकेट खेळण्यासाठी या खेळाडूला चांगल्या बूटांची गरज होती. पण त्याच्याकडे एक जोडी बूट विकत घेण्याचेही पैसे नव्हते. पण हा खेळाडू आपला हा संघर्ष अजूनही विसरलेला नाही. जर एखाद्या गरीब मुलाल काही क्रिकेटची साहित्य हवी असतील तर तो आपल्याकडील साहित्य किंवा पैसे त्या गरिब मुलांना देतो.
खेळाडूच्या मित्राने केला खुलासा…भारताचा हा खेळाडू एका क्रिकेटच्या कार्यक्रमात आला होता. यावेळी त्याचा खास मित्रही त्याच्याबरोबर होता. या मुलाखतीमध्ये त्याच्या खास मित्राने काही खुलासे केले आहेत. तो मित्र म्हणाला की, ” आमच्या या मित्राबरोबर मी बोर्डींग स्कूलमध्ये शिकत होतो. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही घरी आलो तेव्हा हा चांगलाच जाड झाला होता. त्यामुळे त्याचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्याला त्याच्या काकांनी क्रिकेटच्या मैदानात धावण्याचा व्यायम करण्यासाठी नेले होते. तिथूनच या क्रिकेटपटूला खेळाची गोडी लागली आणि आता भारताचा खेळाडू होऊ शकला.”
हा खेळाडू आहे तरी कोण…आता हा खेळाडू आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. तर हा खेळाडू आहे भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव. कुलदीपची लहानपणी परिस्थिती बिकट होती. त्यावेळी बूट घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. या गोष्टी तो विसरलेला नाही. भारतीय संघात खेळत असला तरी कुलदीप गरजू क्रिकेटपटूंना सर्वतोपरी मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times