याबाबत जावेद म्हणाला की,” मला आश्चर्य भारताबाबत वाटते. कारण भारत आता चांगलाच स्थिरस्थावर झालेला आहे. त्यांनी आयपीएलही सुरु केले आहे. आयपीएलमध्येही मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग झाल्याचे प्रकार घडले. भारत हा मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगच्या माफियांचा मोठा अड्डा आहे. कारण जेव्हा मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगच्या बातम्या पाहायला मिळतात तेव्हा या प्रकरणाचा संबंध भारताशी असल्याचे पाहायला मिळते.”
अकिब जावेद हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज होता. वसिम अक्रमबरोबर त्याने गोलंदाजीही केली आहे. यावेळी जावेदने फक्त भारतावर निशाणा साधलेला नाही, तर पाकिस्तानलाही लक्ष्य केले आहे. पण पाकिस्तानपेक्षा जास्त त्याने भारतावर तोफ डागल्याचे पाहायला मिळत आहे.
तो पुढे म्हणाला की, ” पाकिस्तानातही काही तशी लोकं आहेत. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये जर का एखादा खेळाडू सापडला तर तो बाहेर पडू शकत नाही. कारण जे हा धंदा करतात त्या माफियांविरुद्ध कोणतीही कारवाई केल्याचे पाहण्यात मिळत नाही. सुरुवातीला खेळाडू ही गोष्ट करायला जातात खरे, पण त्यानंतर ामधून बाहेर पडणे त्यांच्यासाठी शक्य होत नाही. कारण एकदा ही गोष्ट केल्यावर त्यामधून बाहेर पडणे हे अशक्यप्राय बनते. त्यामुळे सुरुवातीला यामध्ये गेलेला खेळाू कधीही यामधून बाहेर पडलेला पाहायला मिळत नाही. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग केले तर आजीवन बंदी येऊ शकते. त्यामुळे खेळाडूची कारकिर्द संपते. पण माफिया मात्र चांगलेच पैसे कमावतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डचे माफियाही आहेत. त्यामुळे एखादवेळी जर खेळाडू किंवा अन्य कोणाला अटक झालेली आपण पाहतो. पण या माफियांना कधीही अटक झाल्याचे पाहायला मिळत नाही.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times