करोना व्हायरसमुळे भारताचा गेला क्रिकेट मोसम हा लवकर संपवावा लागला. आता पुढचा मोसम कधी सुरु होईल, हे सांगता येणार नाही. करोना व्हायरसमुळे क्रिकेट संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच बीसीसीआयने एकाच वेळी दोन भारताचे संघ मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. पण जर दोन संघ उतरवले तर या संघांचे कर्णधार कोण असतील आणि कोणत्या देशांबरोबर एकाच वेळेला सामने होतील, हेदेखील बीसीसीआयने ठरवले आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे बीसीसीआयचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान लवकर भरून काढायचे असून यासाठी बीसीसीआयने नवीन शक्कल लढवली आहे. त्यानुसार भारताचे दोन वेगवेगळे संघ केले जातील. एक संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल, तर दुसऱ्या संघापुढे इंग्लंडचे आव्हान असेल. त्यामुळे बीसीसीआयचे उत्पन्न वाढेल आणि नुकसान भरून काढता येईल.

टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती प्रसारीत केली होती. त्यानुसार भारताचे दोन संघ एकाच वेळेला खेळतील. एक संघ ऑस्ट्रेलियाबरोबर कसोटी सामना खेळेल, त्यापूर्वी दुसरा संघ इंग्लंडबरोबर ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय सामना खेळू शकतो. त्यामुळे जेव्हा क्रिकेट सुरु होईल, तेव्हा चाहत्यांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे.

भारताने जर दोन संघ तयार केले तर त्यांना किमान ३० खेळाडू लागतील, त्याचबरोबर सपोर्ट स्टाफही दुप्पट लागेल. त्याचबरोबर एकाच संघात सर्व दमदार खेळाडू असू शकणार नाहीत, कारण दोन्ही संघांमध्ये समतोल ठेवावा लागेल. याचा विचार बीसीसीआय आणि निवड समितीला करावा लागणार आहे. पण जर हे दोन संघ खेळवले गेले तर त्यांचे कर्णधारपद कोणाकडे असेल, याची उत्सुकता सर्वांना असेल

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळेल तेव्हा विराट कोहली हा भारताने नेतृत्व करेल. दुसरीकडे जेव्हा भारताचा संघ इंग्लंडबरोबर ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय सामने खेळेल तेव्हा भारताचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवण्यात येऊ शकते. त्यामुळे आता भारताचे दोन संघ कसे कामगिरी करतील, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here