नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून भारतीय क्रिकेटपटूंनी आफ्रिदीला धारेवर धरले आहे. फक्त क्रिकेटपटू नाही तर अन्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी आफ्रिदीचा समाचार घेतला.

वाचा-
आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर गौतम गंभीर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी त्याला सुनावले होते. आता भारताचा सलामीचा फलंदाज गब्बर याने आफ्रिदीला काश्मीरवरून चोख उत्तर दिले.

जेव्हा सारे जग करोनाविरुद्ध लढत असताना तुम्हाला मात्र काश्मीरची पडली आहे. काश्मीर आमचे होते, आमचे आहे आणि आमचेच राहणार. आमचा एक सवा लाखाच्या बरोबर आहे. बाकी मोजदाद तुम्ही करून घ्या, असे शिखरने ट्विटवर पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये शिखरने आफ्रिदीला टॅग केले.

वाचा-
शिखर धवनच्या आधी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि आफ्रिदी हे जोकर असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानकडे ७ लाख जवान आहेत आणि त्याला २० कोटी लोकांचे समर्थन आहे असे १६ वर्षाच्या आफ्रिदीचे म्हणणे आहे. असे असून देखील ७० वर्षापासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत. आफ्रिदी, इम्रान खान, कमर जावेद बाजवा यासारखे जोकर पाकिस्तानमधील लोकांना मुर्ख बनवत आहेत. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बोलल्यामुळे काश्मीर नाही मिळणार ना की बांगलादेश, असे गंभीरने म्हटले होते.

पाहा काय म्हणाला होता आफ्रिदी-

सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक व्हिडिओ शेअर झाला होता. त्यात त्याने पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावर युवराज सिंग आणि हरभजन सिंगने देखील टीका केली. या दोघांनी आफ्रिदीच्या सामाजिक कामाचे काही दिवसांपूर्वी कौतुक केले होते. आता या दोघांनी आफ्रिदी मैत्रीच्या लायक नसल्याचे म्हटले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here