बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विविध क्रीडाप्रकारांमध्ये भारताला पदकांची अपेक्षा असणार आहे. भारताच्या लॉन बाउल्स संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत चार जणींच्या सांघिक (फोर्स) प्रकारात न्यूझीलंडवर १६-१३ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह भारताचे लॉन बाउल्समधील किमान रौप्यपदक निश्चित झाले. भारताचे हे ऐतिहासिक पदक ठरणार आहे. कारण या प्रकारात भारतीय संघ राष्ट्रकुलमध्ये प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. चार जणींच्या भारतीय महिला संघात लव्हली चौबे (लीड), पिंकी (दुसरी), नायनमोनी साइकिया (तिसरी) आणि रुपा राणी तिर्की (स्कीप) यांचा समावेश आहे. आता सुवर्णपदकासाठी भारतीय महिला संघाची आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होईल.

दुसरीकडे, भारतीय हॉकी संघाचा सामना आज इंग्लंडविरुद्ध होणार असून मागील पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताने याआधी घानावर ५-० ने तर वेल्सविरुद्ध ३-१ ने विजय मिळवला होता.

मेडल्सचा डबल धमाका… ज्युदोमध्ये भारताला दोन पदकं; सुशीलादेवीला रौप्य, तर विजयला कांस्य

आज किती वाजता कोणता सामना होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अॅथलेटिक्स : ऊंचउडीत तेजस्विन शंकर आणि लांबउडीमध्ये मोहम्मद अनस व मुरली श्रीशंकर हे पदकाचे दावेदार मानले जात आहेत. हा सामना दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे.
बॅडमिंटन : मिक्स्ड टीम इवेंटचे सामने दुपारी ३.३० वाजता सुरू होतील.
वेटलिफ्टिंग : पुरुष ९६ किलो गटात विकास ठाकूर आणि महिला ७६ किलो गटात पूनम यादव, महिला ८७ किलो गटात बीएन उषा या पदक मिळवण्याच्या दावेदार असून दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
लॉन बॉल: महिला संघाचा अंतिम सामना ४.१५ वाजता रंगणार आहे.
हॉकी : भारतीय महिला हॉकी संघाचा आज ६.३० वाजता इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे.
बॉक्सिंग : रोहित टोकस याचा रात्री ११.४५ ला तर आशिष कुमारचा सामना रात्री १ वाजता होईल.

CWG 2022 : मीराबाई चानूने इतिहास रचला, कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक, देशभरात जल्लोष

चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदके

भारताचा वेटलिफ्टर अचिंता शेउलीने सोमवारी सुवर्णपदक मिळवलं आहे. चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदके जमा झाली आहेत. विशेष म्हणजे ही तिन्ही सुवर्णपदके भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत. चौथ्या दिवसअखेर भारताच्या खात्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक जमा झाले आहे. अचिंताच्या आधी मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा यांनी भारताला सुवर्णयश मिळवून दिले. भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पार पडलेल्या पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अचिंताने एकूण ३१३ किलो (१४३ किलो+१७० किलो) भार उचलून सुवर्णपदक निश्चित केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here