मुंबई: करोना व्हायरसमुळे भारतात गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले आहेत. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून काही सवलती दिल्या जात आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) पुढील महिन्यापासून पुन्हा एकदा क्रिकेट सुरू करता येऊ शकले अशी शक्यता निर्माण झाली आहे.

वाचा-
केंद्र सरकराने लॉकडाऊनच्या काळात काय सुरू करावे आणि काय नाही याचे बरेच अधिकार राज्य सरकारांना दिले आहेत. कर्नाटक सरकारने व्यापार आणि व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अशातच आता बीसीसीआयला देखील पुढील महिन्यापासून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सुरू करायची इच्छा आहे. बोर्डाचे अधिकारी आणि मॅनेजर गेल्या दोन महिन्यांपासून संपर्कात आहेत. त्यामुळे जून महिन्यापासून क्रिकेट मैदानावर हलचाली दिसू लागतील.

वाचा-
देशात पुन्हा क्रिकेट सुरू करण्यासंदर्भात बीसीसीआय केंद्र सरकारसोबत संपर्कात आहे. बीसीसीआय क्रिकेट सामने सुरू करण्याआधी सराव सत्र सुरू करण्याचा विचार करत आहे. पण भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी सुरू होईल याबाबत सांगण्यास कोणीच तयार नाही.

वाचा-
भारतात मार्च महिन्याच्या मध्यापासूनच क्रिकेट सामने बंद करण्यात आले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने अनिश्चित काळाासाठी स्थगित केली होती.

वाचा-

आयपीएलवर पहिली नजर

बीसीसीआयला सर्वात पहिली काळजी आहे ती आयपीएलसाठी वेळ उपलब्ध करून देण्याची. या स्पर्धेवर तब्बल ४ हजार कोटी इतकी मोठी रक्कम लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आधीच २ हजार कोटी प्रसारणकर्ता आणि स्पॉन्सर्सकडून घेतले आहेत. त्यामुळे ८ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाची काळजी बीसीसीआयला आहे. आयपीएलच्या तुलनेत द्विपक्षीय मालिका खेळवणे इतके अवघड असणार नाही. कारण त्यात फक्त दोनच संघ असतील. पण आयपीएलच्या आयोजनात ८ संघ त्यात परदेशी खेळाडू देखील असल्यामुळे नियोजन करणे अवघड ठरू शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here