नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू गेल्या काही दिवसांपासून भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबद्दल बेताल वक्तव्य करून चर्चेत आला आहे. पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि त्याला मित्र मानणाऱ्या आणि यांनी देखील आफ्रिदीला सुनावले होते.

वाचा-
या दोघांनी तो मैत्रीच्या लायक नसल्याचे म्हटले सांगितले. यानंतर हरभजन सिंगने आफ्रिदीला ट्विटवर अनफॉलो केले. पण काही त्याच्या सोबत सोशल रिलेशन ठेवून आहेत.

वाचा-
भारतीय क्रिकेटपटूमध्ये युवराज सिंगसह , कर्णधार विराट कोहली हे खेळाडू अद्याप शाहिद आफ्रिदीला फॉलो करतात. करोना व्हायरसमुळे अडचणीत आलेल्या लोकांना मदत केल्याबद्दल हरभजन आणि युवराज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी आफ्रिदीचे कौतुक केले होते. त्यानंतर भारतीय युझर्सनी त्यांना ट्रोल केले होते.

पाहा-

काय म्हणाला होता आफ्रिदी PM मोदींबद्दल…

सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.

काश्मीरचा संघ करण्याची मागणी…

एका ठिकाणी बोलताना आफ्रिदी म्हणाला, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगू इच्छीतो की जेव्हा पुढच्यावेळी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे आयोजन केले जाईल तेव्हा त्यात एका नव्या संघाचा समावेश केला जावा. हा संघ काश्मीरचा असेल. या टीमकडून अखेरचा क्रिकेट सामना कर्णधार म्हणून खेळण्यास मला आवडले. मी पीसीबीला विनंती करतो की, पुढचा संघ काश्मीरचा असावा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here