करोना व्हायरसचा मोठा धक्का आता भारताला बसणार असल्याचे दिसत आहे. कारण भारतीय संघाला करोनामुळे आता तीन दौरे रद्द करावे लागणार असल्याचे दिसत आहे. हे तीन दौरे रद्द झाले तर बीसीसीआयला मोठा नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

वाचा-

बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट मालिका रद्द केली होती त्यानंतर आता आयपीएल कधी होईल, हेदेखील सांगता येत नाही. त्यामध्येच आता तीन दौऱ्याचे नुकसान भारताला सोसावे लागू शकते. त्यामुळे आता नेमके काय करायचे, याचा विचार बीसीसीआय करत आहे.

वाचा-

भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेत करोनाचा जास्त प्रसार झालेला नाही. पण सुरक्षिततेचा उपाय भारतीय खेळाडूंना घ्यावा लागेल. त्यामुळे हा दौरा होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. त्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरही जाणार होता. भारतीय संघ या दौऱ्यात ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता, पण हा दौराही होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे.

वाचा-

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील अधिकाऱ्याने भारतीय संघ आमच्या देशाच्या दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले आहे. पण बीसीसीआयने ही गोषअट साफ नाकारली आहे. कारण आतापर्यंत या दौऱ्याबाबत कोणतीही गोष्ट ठरवण्यात आलेली नाही. त्यामुळे हा दौरा होणार की नाही, हे आता सांगता येत नाही. करोनाचा प्रसार जर थांबू शकला नाही तर भारताचा हा दौराही रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

वाचा-

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी याबाबत सांगितले की, ” सध्याच्या घडीला करोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका आणि झिम्बाब्वे देशांचा दौरा करणार आहे. पण दोन महिन्यानंतर परिस्थिती नेमकी कशी असेल हे सांगता येत नाही. त्यावेळी जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कोणत्याही क्रिकेट मंडळाला दौऱ्याबाबतचे आश्वासन दिलेले नाही. कारण सध्या आम्ही परिस्थिती पाहत आहोत आणि अंदाज घेत आहोत. त्यामुळे सध्याच्या घडीला आम्ही कोणताही दौरा करण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here