सध्याच्या घडीला आयसीसीने आपल्या कोणत्याही स्पर्धांबाबत निर्णय घेतलेला नाही. स्पर्धा सुरु करण्यापूर्वी प्रत्येक देशामध्ये काय वातावरण आहे, हे पाहणे आयसीसीसाठी महत्वाचे आहे. आयसीसीला थेट स्पर्धा घेता येऊ शकत नाही. कारण त्यासाठी खेळाडूंसाठी फिटनेस आणि सराव या दोन महत्वाच्या गोष्टी आहे. त्यामुळे आयसीसीने सुरुवातीला स्थानिक क्रिकेटवर भर द्यायला सुरुवात केली आहे.
वाचा-
याबाबत आयसीसीने सांगितले आहे की, ” सध्याच्या घडीला आमचे प्राधान्य हे सुरक्षेलाच आहे. कारण जर योग्य सुरक्षा नसेल तर खेळ होऊ शक नाही. त्यामुळे क्रिकेटची सुरुवात करताना कोणतीही जोखीम उचलू नका. कारण जोखीम उचलली तर त्याचे वाईट परीणामही दिसू शकतात. त्यामुळे जोखीम न उचलता क्रिकेटची सुरुवात सर्वांनी करायला हवी.”
करोना व्हारसमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, हे कोणीही सांगू शकत नाही. पण दुसरीकडे बीसीसीआयने मात्र आयपीएलसाठी कंबर कसल्याचे म्हटले जात आहे. विश्वचषक जर रद्द करण्यात आला तर त्या कालावधीमध्ये आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याचे समजते आहे. पण जर विश्वचषर स्पर्धा रद्द होत असेल तर खेळाडू आयपीएल खेळायला भारतामध्ये येतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
वाचा-
आयसीसीने क्रिकेट सुरु करण्याबाबत पुढे सांगितले की, ” तुम्ही जर क्रिकेटचा सराव करायला सुरुवात करत असाल तर सुरक्षितता पहिली पाहायला हवी. तुम्ही जिथे सराव करणार ते मैदान, येणारे खेळाडू, क्रीडा साहित्य यांच्याबाबत खबरदारी घ्यायला हवी. जर खबरदारी घेतली गेली नाही तर पुन्हा एकदा क्रिकेटला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times